चंदीगड – लॉक डाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देण्याबाबतच्या निर्देशांबाबत केंद्र सरकारने पुन्हा एकदा विचार करावा असे स्पष्ट मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लॉक डाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी बोलताना त्यांनी लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये कोणीही कोणीही कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये कपात करू नये असे निर्देश दिले होते.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, लॉक डाउनच्या काळात कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन दिल्यास उद्योजक, छोटे व्यापारी, दुकानदार अशा व्यावसायिकांवर दिवाळखोरीची वेळ येईल अशी चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारने वेतनाबाबतच्या निर्देशांचा पुनर्विचार करायला असे मत देखील त्यांनी मांडले.