मुंबई: आमचा स्वतःचा मुख्यमंत्री बनवण्याइतके आमच्याकडे आकडे आहेत, हे दर्शविण्याची गरज नाही. आमच्याकडे पर्याय आहेत, आम्ही पर्यायांशिवाय बोलत नाही. महायुतीला जनमताचा कौल असेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
भाजपने आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर करावे. त्यानंतरच शिवसेना सरकार स्थापन करून सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. राऊत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपकडे संख्याबळ असल्यास त्यांनी सरकारची स्थापना करावी. भाजपचे नेते राज्यपालांना भेटून मोकळ्या हातांनी का परतले. भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची असल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केला. भाजप स्वत:देखील सत्तास्थापनेचा दावा करत नाही आणि इतरांनाही पुढे जाऊ देत नाही. संविधान ही या देशातील लोकांची आहे, ती त्यांची (भाजपची) वैयक्तिक मालमत्ता नाही. आम्हाला घटना चांगलीच ठाऊक आहेत. आम्ही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू, असे राऊत यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.
Sanjay Raut: If you (BJP) have the numbers,form the govt. If you don’t have the numbers then admit it. Constitution is for the people of this country,it is not their (BJP’s) personal property.We know the constitution well.We’ll form CM of Shiv Sena in Maharashtra constitutionally https://t.co/Tw1YL3Ubvl
— ANI (@ANI) November 7, 2019