नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक नवीन घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकारी कार्यालयांमध्ये आता मुख्यमंत्री किंवा अन्य कोणत्याही नेत्यांची प्रतिमा असणार नाही.
या कार्यालयांमध्ये आता केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीकारक भगतसिंह या दोघांच्याच प्रतिमा लावल्या जातील. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केल्याचे मानले जात आहे.
केजरीवालांनी राज्यातील कोविड स्थितीवरही यावेळी भाष्य केले असून त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील कोविडची स्थिती आता नियंत्रणात येत असून गेल्या दहा दिवसांत बाधित रूग्णांची संख्या 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. दिल्लीतील दुकानदारांवरील निर्बंध हटवण्याची तसेच विकएंड लॉकडाऊन मागे घेण्याचा प्रस्ताव उपराज्यपालांना सादर केला आहे, त्यावर लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.