पुणे – उन्हाचा चटका काही प्रमाणात जाणवत असतानाच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा गारठा जाणवू लागला आहे. बुधवारी अनेक ठिकाणी पारा 13 अंशांपर्यंत घसरला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात असणारी द्रोणीय स्थिती व चक्राकार वारे यामुळे हवामानात बदल झाला आहे.
राज्यात सर्वात कमी तापमान नगर येथे 13.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातसुद्धा दोन दिवसांपासून किमान तापमानात घट झाली आहे. पुण्यात बुधवारी तापमान 13.7 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. याशिवाय, नाशिकमध्ये सुद्धा तापमान 14 अंश सेल्सिअस होते. दरम्यान विदर्भात येत्या चोवीस तासांत वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.