अनेक गुप्तचर संघटनेकडून सरकारला इशारा
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरविषयीला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर दहशवाद्यांच्या कारवाया वाढताना दिसत आहेत. त्यातच आता काल अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर या कारवायांमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण पाकिस्तानमध्ये असणारी जैश -ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना देशात मोठा हल्ला करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक गुप्तचर संघटनांकडून केंद्र सरकारला ही माहिती देण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर देशात सतर्कतेचे आदेशदेखील देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
देशात मागील काही दिवसांपासून तणावपुर्ण शांतता पहायला मिळत आहे. दरम्यान, जम्मू-काश्मिरचे कलम 370 रद्द केल्यानंतर आता देशातील अतिसंवेदनशील असणारे अयोध्या प्रकरण निकाली लागले आहे. याच निकालानंतर आता दहशतवादी पुन्हा एकदा देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. डार्क वेब याविषयीची माहिती देण्यात आली आहे. अनेक गुप्तचर संस्थांनी सरकारला इशारा दिला आहे की जैश अनेक दहशतवादी हल्ले करू शकतात. ही माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रॉ आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांनी सरकारला दहशतवाद्यांकडून करण्यात येणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांविषयी इशारा दिला आहे. त्यानुसार सरकारने देशातील अनेक राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अयोध्या निकालानंतर देशात दहशतवाद्यांकडून हल्ला करण्याची शक्यता आता तीव्र झाली असून त्याच पार्श्वभूमीवर अनेक गुप्तचर संघटनांनी याविषयीची माहिती सरकारला दिली आहे. आणखी एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, दहशतवाद्यांना जातीय सलोखा बिघडवायचा आहे. दहशतवाद्यांच्या डार्क वेबमध्ये कोडेड संप्रेषण इतर एजन्सीमध्ये विलीन केले गेले, तेव्हा सुरक्षा संस्था संभाव्य हल्ल्यांचा सामना करण्यासाठी कशी तयारी करावी या निष्कर्षापर्यंत पोहोचले.
दहशतवादी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशला लक्ष्य करू शकतात. 5 ऑगस्टपासून सुरक्षा संस्था उच्च सतर्कतेवर आहेत. या तारखेला भारतीय संसदेने जम्मू-काश्मीरमधून विशेष राज्याचा दर्जा मागे घेतला होता. मात्र यावेळी, “दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न पूर्वीपेक्षा वेगळा आणि ठाम दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.