भुवनेश्वर -पश्चिम बंगालच्या तुलनेत कमी असला तरी ओडिशालाही अम्फानचा तडाखा बसला. त्या महाचक्रीवादळामुळे ओडिशात सुमारे 45 लाख लोक प्रभावित झाल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.
वादळामुळे ओडिशाच्या काही भागांत मुसळधार पाऊस कोसळला. वादळ आणि पावसामुळे त्या राज्याच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतील वीज आणि दूरसंचार जाळ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय, शेतीलाही फटका बसला. तसे असले तरी मोठी हानी टळल्याने ओडिशा सरकारने भारतीय हवामानशास्त्र विभागाचे तोंडभरून कौतुक केले.
विभागाने अचूक अंदाज दिल्याने नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला समर्थपणे करण्यास मोलाचा हातभार लागल्याचे त्या सरकारने म्हटले.