मुंबई – फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात सीबीआयला पुन्हा मोकळीक देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील महाविकास आघाडी सरकारने सीबीआय व अन्य केंद्रीय यंत्रणांच्या पक्षपातीपणाला विरोध म्हणून राज्यात सीबीआयला तपास करण्यास अनुमती नाकारली होती.
सीबीआयला आपल्या राज्यात तपास करण्यास अनुमती द्यायची की नाही याचा अधिकार राज्य सरकारांना असतो. त्यानुसार देशातल्या अन्य काही राज्यांबरोबरच महाराष्ट्रानेही सीबीआयला येथे तपास करण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या अनुमती शिवाय येथे तपास करण्यास सीबीआयला मज्जाव होता. पण राज्यातील नव्या सरकारने मागील सरकारचा निर्णय रद्द बातल ठरवून सीबीआयला पुन्हा खुली छूट दिली आहे.
हा निर्णय घेतल्याने सीबीआयला यापुढे महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज भासणार नाही, असे संबंधीत अधिकाऱ्याने सांगितले. उद्धव ठाकरे सरकारने 21 ऑक्टोबर 2020 मध्ये सीबीआयची संमती काढून घेतली होती.