मंड्या : लेखक केएस भगवान यांनी कर्नाटकात पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. तथाकथित बुद्धीवादी लेखक केएस भगवान प्रभू रामाबद्दल केलेल्या विधानामुळे सध्या वातावरण तापले आहे.
एका कार्यक्रमात भगवान रामाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘ते रोज दुपारी माता सीतेसोबत बसून दारू प्यायचे. वाल्मिकी रामायणातही सांगितले आहे,’ असेही ते म्हणाले.
Mandya, Karnataka | There is talk about building a Rama Rajya…If one reads the Uttara Kanda of Valmiki’s Ramayana, it will become evident that (Lord) Rama was not ideal. He did not rule for 11,000 years, but only for 11 years: KS Bhagawan, Retired Professor & Writer(20.1) pic.twitter.com/Z0DMuRIlTq
— ANI (@ANI) January 22, 2023
लेखक पुढे म्हणाले की,’ रामराज्य करण्याची चर्चा आहे. वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडाच्या वाचनावरून असे दिसून येते की (भगवान) राम आदर्श नव्हते. त्याने 11,000 वर्षे राज्य केले नाही तर केवळ 11 वर्षे राज्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या खळबळ उडाली आहे.’
निवृत्त प्राध्यापक आणि लेखक के.एस.भगवान यांनी या कार्यक्रमात म्हटले की, ‘राम दुपारी सीतेसोबत बसायचे आणि दिवसभर दारू प्यायचे. रामाने आपली पत्नी सीतेला वनात पाठवले आणि तिची पर्वा केली नाही. लेखक पुढे म्हणतात की, रामाने शूद्र शंबुकाचा शिरच्छेद केला होता. जो झाडाखाली तपश्चर्या करत होता. तो आदर्श कसा असू शकतो?’
या लेखकाने पहिल्यांदाच रामाचा अपमान केला असे नाही. लेखक केएस भगवान यांनी ‘राम मंदिरा याके बेडा’ या पुस्तकात भगवान रामावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, ‘प्रभू राम नशा करत असत आणि आई सीतेला दारू पाजत असे. त्यावेळी काही हिंदू संघटनांनी भगवान यांच्या या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला होता.’