गिरीध – झारखंडमधील गिरीध जिल्ह्यात मंगळवारी छटपुजेवेळी झालेल्या गर्दीनंतर तेथील नदीच्या पाण्यात चार बालके बुडाल्याची घटना घडली आहे. मनग्रोधीह गावात ही घटना घडली. ही बालके आपल्या आई बरोबर तिकडे छट पुजेला गेली होती.
तेथे पाण्यात नहात असताना हा प्रकार घडला. ही सर्व बालके दहा वर्षाच्या आतील आहेत. त्यांना धावाधाव करून पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तो पर्यंत ती बालके गतप्राण झाली होती.
त्यामुळे छटपूजेच्या उत्सवावर दु:खाचे सावट पसरले आहे. सर्व राजकीय पक्षांनी या घटने बद्दल हळहळ व्यक्त केली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात लटेहर जिल्ह्यात कर्म उत्सवावेळीही सात मुली बुडून मरण पावल्याची घटना घडली होती.