नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन पुकारला आहे. दरम्यान भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या २४ तासात देभशरात ७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
जगाचा विचार केला तर इटलीमध्ये करोनाचा कहरच सुरु आहे कारण मागील चोवीस तासांत इटलीमध्ये १ हजार लोकांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेत १८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत.
भारतात १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाउन आणि संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.