लखनौ – उत्तर प्रदेशमधील आणखी एका मंत्र्याने भारतीय जनता पक्षाला रामराम केल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या भगव्या पक्षाचा त्याग करणाऱ्या आमदारांची संख्या नऊवर पोहोचली आहे.
राज्य सरकारने दिलेली सुरक्षा व्यवस्था आणि निवासस्थान धरमसिंह सैनी यांनी सकाळी परत केले, त्याचवेळी ते पक्ष सोडणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. सैनी यांच्याकडे आयुष, अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार होता.
भाजपाचे कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी त्यांनी अनेक मंत्री आणि आमदार भाजपातून बाहेर पडतील असे सांगितले होते. सैनी हे मौर्य यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.