कोलोंबो – पाकिस्तानमध्ये इशनिंदेच्या आरोपातून झालेल्या जमावाच्या हल्ल्यात श्रीलंकेच्या नागरिकाच्या हत्या प्रकरणी दोषींवर कोणतीही दयामाया दाखवली जामार नाही, अशी हमी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान कान यांनी श्रीलंकेचा अध्यक्ष गोताबाये राजपक्षे यांना दिली आहे.
इम्रान कान यांनी राजपक्षे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि या प्रकरणी आतापर्यंत 113 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व व्हिडीओ आणि माहिती पाकिस्तानी सुरक्षा दालांनी ताब्यात घेतली असल्याचे सांगितले.
श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून कार्यरत असलेले दियावर्दना यांनी व्यवस्थापक म्हणून उत्तम काम केले होते, असेही खान म्हणाले.
श्रीलंकेच्या संसदेने आणि पंतप्रदान महिंदा राजप7े यांनी शनिवारी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला होता. दोषींवर कारवाईची ग्वाही पाकिस्तानचे पंतप्रधान पाळतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.
शुक्रवारी इशनिंदेच्या आरोपावरून तेहरीक ए लबाईक पाकिस्तान या कट्टरवादी इस्लामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सियालकोटमधील कपड्यांच्या कारखान्यावर हल्ला करून दियावर्दना यांची हत्या केली होती. दियावर्दना यांच्या मृतदेहाला या जमावाने पेटवूनही दिले होते. या प्रकरणी पाकिस्तानवर मोठा आंतरराष्ट्रीय दबाव येऊ लागल्यावर 800 जणांवर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील 13 जण या प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत. तर 113 जणांना अटक करण्यात आली आहे.