नवी दिल्ली – सुुधारित बहुपक्षीयवाद ही आजची वास्तविकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करताना सांगितले. पंच्याहत्तर वर्षांपूर्वी मानवी इतिहासामध्ये प्रथमच संपूर्ण जगासाठी एक संस्था तयार केली गेली आणि युद्धाच्या भीतीतून एक नवी आशा निर्माण झाली.
संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक स्वाक्षरीकर्ता या नात्याने भारत हा उदात्त दृष्टीचा भाग होता. त्यातून ज्यात सर्व सृष्टीकडे एक कुटुंब म्हणून पाहिले जाते अशा ‘वसुधैव कुटुंबकम’ हे भारताचे स्वतःचे तत्त्वज्ञान प्रतिबिंबित होते, असेही पंतप्रधान म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांमुळे आपले जग आज एक उत्तम जागा आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानासह शांतता आणि विकासाचे कार्य पुढे नेले, त्या सर्वांना पंतप्रधानांनी अभिवादन केले.
‘बरेच काही साध्य झाले असले तरी अद्याप मूळ ध्येय अपूर्ण राहिले आहे आणि अद्याप संघर्ष रोखणे, विकास करणे, हवामान बदलावर लक्ष देणे, असमानता कमी करणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ उठवणे ही कामे बाकी आहेत.
हे आजच्या घोषणापत्रावरून स्पष्ट होते.’ असे आज मान्यता देण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याबाबत पंतप्रधान म्हणाले. या घोषणापत्रात संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
सर्वसमावेशक सुधारणांशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाला आत्मविश्वासाचे संकट भेडसावत आहे आणि आजची आव्हाने कालबाह्य रचनांसह लढली जाऊ शकत नाहीत. आजच्या परस्परांशी जोडल्या गेलेल्या जगासाठी आपल्याला सुुधारित बहुपक्षीयवादाची आवश्यकता आहे, सुुधारित बहुपक्षीयवाद ही आजची वास्तविकता आहे.
हीच सर्व हितधारकांचा आवाज होते, समकालीन आव्हाने सोडवते आणि मानवी कल्याणावर लक्ष केंद्रित करते. या दृष्टीने इतर सर्व देशांबरोबर काम करण्यासाठी भारत उत्सुक आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.