कोल्हापूर(प्रतिनिधी) – भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये समजूतदारपणा असून दोन्ही संघातील खेळाडू प्रामाणिक आणि देशाच्या प्रेमाखातीर खेळतात. त्यामुळे टी -20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत–पाकिस्तान यांच्यात सामना व्हायला हरकत नाही. खेळाकडे खेळ म्हणून पाहिले पाहिजे. त्याला वादात अडकवणे योग्य ठरणार नाही असे मत माजी क्रिकेटपटू सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. 24 ऑक्टोंबर रोजी भारत पाकिस्तान हा सामना रंगणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरून हा सामना खेळला जाऊ नये. यावरून देशात वाद सुरू आहे.
भारत-पाक सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी क्रिकेटपटू, पद्मश्री सय्यद किरमाणी यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.
सय्यद किरमाणी यांनी 1983 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट विंडीज विरोधात विजय मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज ते एका खाजगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.