नवी दिल्ली – सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वेने यावर्षी छठ पूजेपर्यंत 179 विशेष गाड्यांच्या (जोड्यांमध्ये) 2269 फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे. रेल्वे मार्गावरील दिल्ली-पटना, दिल्ली-भागलपूर, दिल्ली-मुझफ्फराबाद, दिल्ली-सहरसा यासारख्या देशभरातील प्रमुख स्थानकांना जोडण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
गाड्यांच्या अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांचा प्रवेश व्यवस्थित व्हावा यासाठी आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलाच्या देखरेखीखाली रेल्वेच्या अंतिम स्थानकांवर रांगा लावून गर्दीचे व्यवस्थापन केले जात आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रमुख स्थानकांवर आरपीएफचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. गाड्या सुरळीत चालाव्यात, यासाठी प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन सेवेसाठी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे सेवेतील कोणताही व्यत्यय प्राधान्याने हाताळण्यासाठी विविध विभागांमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महत्वाच्या स्थानकांवर चोवीस तास आरोग्य पथके उपलब्ध आहेत. सह-वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका देखील उपलब्ध आहे.