मुंबई – राज्यात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीचे रॅकेट, तसेच पोलिसांमार्फत खंडणी वसूल करण्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले असून या प्रकरणांवर राज्य सरकारने काय कारवाई केली याचा अहवाल प्रशासनाकडून मागवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळगलेले मौन गंभीर आहे. मुख्यमंत्री जर इतक्या गंभीर विषयांवर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं करावे, असे फडणवीस म्हणाले.
I met President Kovind & gave him a memorandum on behalf of RPI (A) party demanding the President’s Rule in Maharashtra. It is a serious matter. No inquiry can take place until the Maharashtra govt is removed. He said that he will consider it: Union Minister Ramdas Athawale pic.twitter.com/RfISJFqaDJ
— ANI (@ANI) March 25, 2021
या वादावरून राजकारण चांगलेच तापले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. याच संदर्भात आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. त्यांनी आरपीआय (ए) पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट देण्याची मागणी केली. या वेळी ते म्हणाले,’ जोपर्यंत महाराष्ट्र सरकार हटविली जात नाही तोपर्यंत चौकशी होऊ शकत नाही. असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट देण्याची मागणी केली.
दरम्यान, ‘दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत या केसेस सचिन वाझेंनी हाताळल्या. सचिन वाझेंना या केसेसवर कुणाला तरी वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. आता सचिन वाझेंना अटक केली आहे. सचिन वाझेंची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी’ मागणी विरोधी पक्ष कडून होत आहे.