पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर भिलवाडा पॅटर्न राबवून बचत गट आणि नगरवस्ती विभागामार्फत नागरिकांना घरपोच अन्न धान्य द्या, म्हणजे स्वस्त धान्य दुकानांजवळ नागरिकांची गर्दी होणार नाही, अशी मागणी आरपीआय नेते आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांना त्यांनी तसे पत्रही दिले आहे. तसेच नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रोजीरोटी चालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांच्या अधिन राहून व्यवसाय करण्याची मुभा द्यावी. याशिवाय वार्ड स्तरावर तपासण्या करण्यात याव्यात, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता किट देण्यात यावेत, आदी मागण्याही डॉ. धेंडे यांनी आयुक्तांकडे केल्या आहेत.