पुणे – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर सोमवारी (दि.9) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 102 व्या घटना दुरुस्तीबाबत घेतलेले निर्णय, मराठा समाजासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा,
प्रस्तावित योजनांना गती देण्यासाठी तसेच सरकारकडून प्रलंबित असणारे विषयावर चर्चा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजातील विविध संघटना, संस्था आणि तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेले आहे. केंद्राच्या निर्णयाने ओबीसी आरक्षणाचा एक अडथळा दूर होणार आहे.
त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठविण्यासाठी घटना दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक उपाययोजना राज्य सरकारला कराव्या लागणार आहे.