मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घेतला आढावा
मुंबई: अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीचा देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. आणि त्यानंतर माध्यमांना माहिती दिली. अवकाळी पावसामुळे ३२५ तालुक्यांमध्ये ५४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाले असून पालकमंत्र्यांना जिल्ह्यात भेटी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे माहितीचा आढावा घेतला. तसेच सर्व राज्यात पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमा कंपन्यांसोबत सोबत देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीचा आज आढावा घेतला आणि त्यानंतर माध्यमांना माहिती दिली. https://t.co/IiRh6AOlTc pic.twitter.com/MczyCr4fZA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 1, 2019
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी विमा कंपन्यांना बोलावून घेतले होते. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आणि कंपन्यांकडे लोक कमी असल्याने सरकारी पंचनामे ग्राह्य धरा, असे आदेश त्यांना दिले आहेत.
तसेच उद्या उपसमितीची बैठक बोलावली आहे. उपसमितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. उद्याच्या बैठकीत तत्काळ शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, याबाबत विचार केला जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होऊ शकलेले नाहीत. त्यांनादेखील मदत मिळेल, याची काळजी घेतली जाईल.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सतत पाऊस होत असल्याने शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोपे, मेथी, धना, शेपू, कोबी, फ्लॉवर, मका, भेंडी, गवार व इतर पिके सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन, ज्वारी, बाजरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.