नगर – गेल्या 35 वर्षापासून साकळाई प्रश्न प्रलंबित आहे. आज पर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करण्यात आले आहे. नगर व श्रीगोंदा तालुक्यातील गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा योजनेला तात्काळ प्रशासकी मान्याता द्यावी. यामागणीसाठी क्रांतिदिनी (दि.9) रोजी जिल्हा परिषद प्रांगनात सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी उपोषन सुरु केले आहे. या आंदोलनाला विविध संघटनेने पांठिंबा दिला आहे.
यावेळी साकळाई कृती समितीचे बाबासाहेब झेंडे, राजाराम भापकर (गुरुजी), नारायन झेंडे, सोमनाथ धाडगे, बाळासाहेब नलगे, डॉ. कृषीराज टकले, सुर्यभान कोतकर, अमोल लंके, रोहिदास उदमले, जिल्हापरिषद सदस्या अनुराधा नागवडे, माजी खासदार दादा पाटील शेळके आदींसह 35 गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी सय्यद म्हणाल्या की, दोन्हीं तालुक्यातील जिरायत भागाला जीवदान ठरणारी साकळाई उपसा योजनेबाबत अनेक वेळा आंदोलने झाली. लोकसभा निवडणूकीत नगर तालुक्यातील वाळकी येथे जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेपूर्वी साकळाई उपसा योजनेला प्रशासकीय मंजूरी दिली जाईल असे, आश्वासन दिल होते. परंतु आजवर या आश्वासनावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
या योजणेला तात्काळ मान्याता मिळाली नाही तर गाव तेथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूकीच्या काळात या योजनेचा राजकीय मुद्दा म्हणून वापर केला. पण निवडणूका संपताच त्याचा या राजकीय नेत्यांना विसर पडला आहे. परंतु साकळाईच राजकारण न करता साकळाई प्रश्न सोडावा व या योजनेला प्रशासकीय मंजूरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.