बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनीचा असा विश्वास आहे की, ती असत्यामध्ये राहत आहे आणि “मी टू’ चळवळीमुळे महिलांच्या सशक्तीकरण आणि लोकांची बदललेली मानसिकता या सर्व गोष्टींवर तिचा विश्वास आहे. ती म्हणाली की, या चळवळींमुळे लोकांची मानसिकता बदलली आहे. गतवर्षी चित्रपटसृष्टीत हॅशटॅग “मी टू’चळवळीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती.
“मी टू’ चळवळीनंतर बॉलिवूडमधील बदलांविषयी विचारले असता सनी म्हणाली, मी कोणत्याही कार्यालयात काम करत नाही. मी खोटया विश्वात जगते, परंतु माझा विश्वास आहे की पुरुष किंवा स्त्री असो, लैंगिक छळ करण्याबद्दल आणि कामाच्या ठिकाणी असुविधाजनक असण्याबद्दल बोलले पाहिजे. कारण मला असे वाटते की पुरुषांच्या बाबतीतही असे घडते.
तो पुरुष असल्यामुळे हे उघड झाले नाही किंवा ती मोठी गोष्ट मानली जात नाही, असे सनीने सांगितले. सनी म्हणाली, जर एखाद्याने कामाच्या ठिकाणी किंवा कोठेतरी कोणाला त्रास दिला, तर तो जितका जास्त बोलेल, लोक तितके अधिक जागरूक होतील. मला विश्वास आहे की त्यामुळे नक्कीच बदल होईल. दरम्यान, या चळवळीची सुरूवात अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला तेव्हा सुरू झाली होती.