निशिकांत पाटील यांचे आवाहन
इस्लामपूर – गेली तीस वर्षात जयंत पाटील यांना मताच्या माध्यमातून दान देऊन राजकीय कारकिर्द मजबूत केली. मात्र याच पांढरीतील कर्तबगार कार्यकर्त्यांवर अन्याय केला. यापुढे कर्तबगारांना संधी मिळेल. तुम्ही एकदा परीवर्तन करा, असे आवाहन अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील शिवाजी चौकात झालेल्या विराट प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, तीस वर्षापूर्वी जयंत पाटील यांचे नेतृत्व स्विकारुन त्यांना हाताच्या फोडाप्रमाणे जपले. या उरुण परिसराने कधीही दगा दिला नाही. मात्र जयंत पाटील यांनी फक्त या परिसरातील जनतेच्या मताचा वापर करुन घेतला. येथील लोकांचे काय प्रश्न आहेत याची साधी चौकशीही केली नाही. इस्लामपूर नगरीतील माणसे पैशाने मिळतात, मते विकत घेता येतात अशी बदनामी केली आहे. हा समज दूर करायचा आहे.
आता परमेश्वरालाही रचनात्मक, गुणात्मक बदल हवा आहे. 161 वर्षात पहील्यांदाच उरणातला, तुमच्या मनातला, घरचा आमदार होण्याची संधी आली आहे. त्यासाठी आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आपला हक्काचा माणूस म्हणून मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. स्वप्नील पाटील, जगन्नाथ मोरे, दिलीप पवार, अशोक खोत, आदीनाथ चौधरी, धनराज पाटील, दिपक थोरात, चंद्रकांत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले