वाघोली – बिवरी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांनी रिंगरोडकरीता एमएसआरडीसीकडून होणाऱ्या मोजणीला विरोध करीत हे काम बंद पाडले. बागायती जमिनीतून हा रस्ता जात असल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण असून वेळप्रसंगी आत्महत्या करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासन, संबंधित विभागासह आमदार अशोक पवार यांना दिले आहे. पुण्याच्या पूर्व भागाची वाहतूक वळवण्यासाठी एमएसआरडीसीचा रिंगरोड हा व्यवहार्य नाही, तरीसुद्धा या रोडची आखणी जबरदस्तीने केली जात आहे, असा आरोप केला जात आहे.