नवी दिल्ली – भारतामध्ये मुस्लिमांचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही देशात भाडेकरू नाहीत, असे वक्तव्य एमआयएमचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर निशाणा साधत केले होते. यावर भाजप प्रवक्ते माधव भंडारी विवादित प्रत्युत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात नवीन वादंगाला सुरुवात झाली आहे.
Madhav Bhandari,BJP on Asaduddin Owaisi: Unhe soch samajh ke bolna chahiye. Unko kisi ne kirayedaar nahi kaha, lekin hissedari ki bhasha bolenge to hissedari 1947 mein de di toh maamla khatam ho gaya pic.twitter.com/8d9N1AtIUS
— ANI (@ANI) June 2, 2019
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना असुदुद्दीन ओवैसी म्हणाले कि, भाजपने लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकल्या म्हणजे आम्ही देशात मनमानी करू, असे पंतप्रधानांनी समजू नये. हे कदापि होणार नाही. भारतीय राज्यघटनेचा हवाला देत मी पंतप्रधानांना इतकेच सांगू इच्छितो की, असुदुद्दीन ओवैसी हा हक्कासाठी तुमच्याशी लढत राहील. यावर भाजप प्रवक्ते माधव भंडारी प्रत्युत्तर देत म्हणाले,’ ओवैसींना कुणी भाडेकरु म्हटलं नाही, पण हिस्सेदारीची भाषा करत असाल तर तुमचा हिस्सा 1947 सालीच देऊन टाकला आहे, त्यामुळे हा विषय संपलाय.’ असदुद्दीन ओवैसींनी थोडंसं विचार करुन बोलावं, त्यांना कुणीही या देशात भाडेकरु म्हटलेलं नाही. असेही ते म्हणाले