मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल काल एक विधान केले होते. इंदिरा गांधींनी आणीबाणीत लोकशाहीची गळचेपी केल्याचे आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी लगेच खुलासा सुद्धा केला. दरम्यान आज अशोक चव्हाण यांनी कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल. असे ठणकावले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.