केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची शिवसेनेवर टीका
नवी दिल्ली : महाविकास आघाडीची राज्यात सत्ता स्थापन होत असल्याचे वाटत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केले आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेवरून आता नवीन वाद होताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेने भाजपवर आरोप करत पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत राज्यात सरकार स्थापन केले असल्याचे म्हटले आहे तर याच आरोपांना आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीबरोबर ते (शिवसेना) गेले तर चांगले, आमच्याबरोबर(भाजपा) आले तर वाईट हे चुकीच आहे,असे जावडेकर म्हणाले.
How absurd the argument of Shiv Sena is — If @ShivSena goes with the #NCP it is good and if #NCP MLAs come with @BJP4Maharashtra it is bad. Today what has been honoured is “Peoples’ Mandate”@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) November 23, 2019
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सगळ्यानांच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केलं आहे. तर शिवसेनेवर टीका केली आहे.
जावडेकर म्हणाले, शिवसेनेने भाजपाबरोबर युती करून मते मागितली. निवडणुकीच्या प्रचारात भाजपाबरोबर सरकार चालवू असे सांगितले. पण, ऐनवेळी कॉंग्रेससोबत जाण्याचं पाप केलं. आज महाराष्ट्रात जे घडले. त्याच मी स्वागत करतो. विशेष म्हणजे राष्ट्रवादीबरोबर शिवसेना गेली तर चांगले आणि आमच्याबरोबर आली तर वाईट. हे कळत नाही. शिवसेनेनं युतीचा घोर अपमान केला आहे. शिवसेनेनं विश्वासघात केला आहे, असे जावडेकर म्हणाले आहेत.