मुंबई – कृषी विषयक विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे (Farmer Protests) मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु असून आज त्यांनी भारत बंद पुकारला आहे. या आंदोलनात राजकीय पक्ष सहभागी झाल्याने हा बंद राजकीय असल्याचा आरोप भाजपने केला आहे. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना कोणत्याही राजकीय पक्षाचा ध्वज हातात घेऊन निषेध करत नाहीत. शेतकऱ्यांच्या एकतेसोबत उभे राहणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य आहे. या ठिकाणी कोणतेही राजकरण सुरू नसून भविष्यातही यात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये.
जर सरकारच्या लोकांना शेतकऱ्यांबद्दल खरेच आपुलकी आणि प्रेम असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) किंवा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे स्वत: आंदोलनाच्या ठिकाणी जातील, शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
If the Government has a heart, be it the Home Minister or the Prime Minister, they themselves will go & talk to them (farmers): Sanjay Raut, Shiv Sena#BharatBandh https://t.co/Qm5RJOXBK6
— ANI (@ANI) December 8, 2020
आज शेतकरी रस्त्यावर आहे, आज तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर देवेंद्र फडणवीससुद्धा (Devendra Fadnavis) शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री आहे, असेही राऊतांनी म्हंटले आहे.