मुंबई: महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून तीव्र पाणीटंचाई आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. एग्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, “दुष्काळाच्या प्रश्नावर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. सरकार दुष्काळावर काय उपाययोजना करतंय हे तर स्पष्ट सांगतच नाही पण कोर्टात साधी हजेरीही लावत नाही. इतके गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही”