पुणे – माध्यमिक शाळांनी विद्यार्थी संख्येची माहिती सादर केल्याशिवाय शाळांमधील शिक्षकेतर संच मान्यता उपलब्ध करून देण्यात येणार नाही, असा इशारा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांना दिला आहे.
राज्य शासनाच्या 28 जानेवारी 2019 च्या निकषानुसार विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता करण्यात येते. अंतिम संचमान्यता जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगइनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंजूर व रिक्त पदानुसार संच मान्यता करण्यात येत असते. अनुज्ञेय ठरणाऱ्या पदांचे वाटप शिक्षण संचालनालय स्तरावरून येणार आहे.
रिक्तपदांचे समायोजन करण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. हे पूर्ण झाल्याशिवाय मंजूर व अनुज्ञेयपदे भरता येणार नाहीत याची खबरदारी शाळा व्यवस्थापनाने बाळगणे आवश्यक आहे. इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग असलेल्या शाळांची संचमान्यतेत विसंगती असलेल्या शाळांना संचमान्यता प्रत देण्यात येणार नाही.