लखनऊ – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाआधी उत्तरप्रदेशमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागसवर्गीय असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना कधीच पंतप्रधान बनवले नसते, अशी टिका बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ट्विटरवरून केली आहे.
पंतप्रधान मोदींनी सपा-बसपा आघाडीवर जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना मायावती म्हणाल्या कि, पंतप्रधान मोदींनी आघाडीवर जातीयवादी असल्याचा आरोप लावला असून हा अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. जातीय अभिशापाने पीडित लोक जातीयवादी कसे काय असू शकतात. मोदी जन्माने ओबीसी नाहीत. त्यांनी जातीयवादी असण्याचे विष प्यायले नाही. यामुळे अशा कल्पना गोष्टी करत आहेत. याविरुद्ध नरेंद्र मोदी स्वतःला जबरदस्तीने अतिमागासवर्गीय सांगून खुल्या पद्धतीने राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जन्मापासून मागासवर्गीय असते तर आरएसएसने त्यांना कधी पंतप्रधान बनविले असते का? असा प्रश्न उपस्थित करत मायावती म्हणाल्या, कल्याणसिंह सारख्यांची आरएसएसने काय वाईट परिस्थिती केली हे देश बघू शकत नाही का? असेही त्यांनी म्हंटले आहे.
इसके विपरीत, श्री मोदी अपने को जबर्दस्ती पिछड़ा बनाकर जातिवाद का खुलकर राजनीतिक स्वार्थ के लिए इस्तेमाल करते हैं। वे अगर जन्म से पिछड़े होते तो क्या आरएसएस उन्हें कभी भी पीएम बनने देती? वैसे भी श्री कल्याण सिंह जैसों का आरएसएस ने क्या बुरा हाल किया है यह देश क्या नही देख रहा है।
— Mayawati (@Mayawati) May 10, 2019