नवी दिल्ली – देशामध्ये सध्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉक डाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून यामध्ये त्यांना यश मिळताना दिसतंय. देशामध्ये लॉक डाऊन लागू केल्याने कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग मंदावण्यामध्ये आपणास यश आल्याचे आकड्यांमधून सिद्ध होतंय. असं असलं तरी देशामध्ये लॉक डाऊन लागू करण्यास विलंब झाल्याचं मत काही राजकीय पक्षांनी व्यक्त केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आज नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी देशातील लॉक डाऊन योग्य वेळी लागू केल्याचं मत मांडलं असून यामुळे रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होण्याचा वेग धीमा करण्यात आपण यशस्वी झाल्याचं म्हंटलं आहे. पॉल यांनी यावेळी बोलताना, देशामध्ये सध्याच्या घडीला कोरोनाचे २३ हजारांच्या आसपास रुग्ण असून आपण लॉक डाऊन लागू केला नसता तर रुग्णसंख्या ७३ हजारांच्या आसपास पोहोचली असती. असा दावा केला आहे.
Our analysis shows lockdown has been effective in slowing the doubling rate of #COVID2019 and saved lives. The lockdown decision was timely as the around 23,000 cases in India today could have been 73,000: Dr VK Paul, Niti Aayog member and Chairman of Empowered Group 1. pic.twitter.com/gPF2SwS5Nc
— ANI (@ANI) April 24, 2020