मुंबई – भारतातील 40 पेक्षा जास्त पत्रकारांवर पेगॅसस नामक सॉफ्टवेअर वापरून पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा जगभरातील 15 मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्यावरून भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी देखील या मुद्द्यावरुन आश्चर्य व्यक्त करत मोदी सरकारने लोकांना माहिती द्यावी अशी मागणी केली आहे.
It is quite clear that Pegasus Spyware is a commercial company which works on paid contracts. So the inevitable question arises on who paid them for the Indian “operation”. If it is not Govt of India, then who? It is the Modi government’s duty to tell the people of India
— Subramanian Swamy (@Swamy39) July 19, 2021
सुब्रहमण्यम स्वामी म्हणाले की,’या प्रकरणात पेगॅसस स्पायवेअर या व्यावसायिक कंपनीला भारतातील ऑपरेशनसाठी पैसे कोणी दिले हा महत्वाचा प्रश्न आहे. जर भारत सरकार नाही तर मग कोण? भारतातील जनतेला सांगणं हे भारत सरकारचं कर्तव्य आहे.’ असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील पत्रकार, नेते आणि प्रतिष्ठीत लोकांचे फोन हॅक केल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मीडियात सुरु आहे. इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या हॅकिंग सॉफ्टवेअर पेगॅससचा यासाठी वापर केल्याचे बोलले जात आहे.