मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले.यानंतर उद्धव ठाकरे गटाने फुटीबाबत न्यायालयाचे दार ठोठावले. यामुळे सध्या शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. राष्ट्रवादीसह ठाकरे गटाचे अनेक नेते हे सरकार लवकरच कोसळेल अशी भविष्यवाणी करताहेत. अशात शिंदे सरकार कोसळेल म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले असल्याचं खळबळजनक विधान ठाकरे गटाच्या नेत्याने केले आहे.
औरंगाबादचे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हे धक्कदायक विधान केले आहे. राज्यातील २२ नाराज आमदार फडणवीसांच्या संपर्कात आहेत असं खैरे म्हणाले. गद्दारीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अनेकांना पराभवाची भीती वाटत आहे. छगन भुजबळ,नारायण राणे हे पडले होते तर एकनाथ शिंदे यांचा देखील पराभव होणार. एव्हडेच नाही तर शिंदे गटातील ४० आमदार पडतील असही खैरे यावेळी म्हणाले.
सरकारबाबत काय म्हणाले खैरे नेमकं यावेळी
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात.
हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते.
हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे.
फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत असंही खैरे यावेळी म्हणाले.