नवी दिल्ली – 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा बहुमताने परतण्याचा दावा करत आहे, तर काँग्रेस भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आपली गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे, अनेक विरोधी पक्ष तिसऱ्या आघाडीची कसरत करत आहेत. दरम्यान, इंडिया टुडेने ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षण केले असून, त्यामध्ये देशातील लोकांचे मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या सर्वेक्षणादरम्यान लोकांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी आपली मते मांडली. यामध्ये आज देशात लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाचे सरकार स्थापन होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना देशातील जनतेने पुन्हा एकदा एनडीएला बहुमत दिले आहे. म्हणजेच आज निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा भाजप केंद्रात बहुमताने सरकार स्थापन करू शकते. काँग्रेसच्या कामगिरीत थोडी सुधारणा झाली असली, तरी भाजपला सत्तेपासून दूर करता येईल इतका मोठा फायदा काँग्रेसला मिळत नाही. कारण, हा आकडा 100 च्या आसपासही दिसत नाही. बघा काय आहे देशाचा राजकीय मूड
आज निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळणार? (एकूण ५४३ जागा)
एनडीए – 298
यूपीए – 153
इतर – ९२
आज निवडणूक झाली तर कोणत्या आघाडीला किती टक्के मते मिळतील?
एनडीए – 43
UPA – 30
इतर – 27
आज निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती मते मिळतील?
भाजप- 39%
काँग्रेस – 22%
इतर – 39%
एनडीएला कोणत्या राज्यात फायदा होईल?
आसाम – 12 जागा (2019 मध्ये 9 जागा)
तेलंगणा – 6 जागा (2019 मध्ये 4 जागा)
पश्चिम बंगाल – 20 जागा (2019 मध्ये 18 जागा)
उत्तर प्रदेश – 70 जागा (2019 मध्ये 64 जागा)
यूपीएचा फायदा कोणत्या राज्यात होईल?
कर्नाटक – 17 जागा (2019 मध्ये 2 जागा)
महाराष्ट्र – 34 जागा (2019 मध्ये फक्त 6 जागा मिळाल्या)
बिहार – 25 जागा (2019 मध्ये फक्त 1 जागा)