हरयाणा- महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील विधासभा निवडणूक एकाच दिवशी होणार असून, निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. याच प्राश्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची हरियाणातील इलेनाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, या सभेत मोदींनी कलम 370 चा विषय काश्मीरसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. ‘जम्मू काश्मीरमध्ये काय होणार, कोणत्या दिवशी काय घडणार, हे आधी फुटिरतावादी, दहशतवादी आणि बाजूच्या देशातली काही माणसं ठरवायची. मात्र आता सर्व काही आपण ठरवतो’. अशा शब्दांत मोदींनी प्रचारात कलम 370 चा मुद्दा उपस्थित केला.
आपली धोरणं आपण ठरवतो. आता ते आपलं भाग्य ठरवणार नाहीत. कारण देश बदलला आहे. असं देखील मोदी यावेळी म्हणाले.
पाकिस्तान से भेजे आतंकवादियों के बल पर, अलगाववाद के नाम पर और अनुच्छेद 370 दिखाकर डराया जाता रहा।
पहले सारा कैलेंडर आतंकी तय करते थे।
अब कैलेंडर वो तय नहीं करेंगे। अब तारीखें हिंदुस्तान तय करेगा: पीएम मोदी #BJPWinningHaryana pic.twitter.com/NOufLP4KnN
— BJP (@BJP4India) October 19, 2019