मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागते की काय अशी परिस्थिती सध्या शिवसेनेवर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबाबत असलेल्या आमदारांचीही संख्या जास्त आहे. तर दुसरीकडे शिवसेनेसोबत काहीच आमदार शिल्लक आहेत. अशा स्थितीत राज ठाकरे शिवसेनेत असते तर उद्धव ठाकरेंना मोठा आधार मिळाला असता आशिया चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
शिवाय जर आज राज ठाकरे हे शिवसेनेसोबत असते तर परिस्थिती इतक्या हाताबाहेर गेलीच नसती. शिवसेनेतले हे बंड त्यांनी मोडून काढले असते. अशी चर्चा आता सुरु आहे. अनेक शिवसैनिक तसेच ठाकरे कुंटुंबाचे जे निकटवर्तीय आहेत, त्यांच्यामध्ये देखील हीच चर्चा आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवली. तेव्हा देखील राज ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख असावेत अशी पक्षातील अनेकांची इच्छा होती. 2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. राज हे शिवसेनेत असते, तर त्यांनी उद्धव यांना या पेचप्रसंगातून बाहेर काढले असते.