केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची राहुल गांधींवर टीका
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाऊडी मोदी कार्यक्रमावरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा केंद्रीय मंऋी रामदास आठवले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांना आपला पक्ष नीट सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
Union Minister Ramdas Athawale: Even after doing well for 5 yrs, some people tried to malign PM Modi’s image. But people had decided that there was no alternative to Modi Ji. If Rahul Gandhi cannot manage his party well, how would he govern the country?As a result, he lost Amethi pic.twitter.com/pV65GLthzf
— ANI (@ANI) September 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हल्लाबोल केला आहे. त्यात राहुल गांधींचा आठवले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पाच वर्षे चांगली कामे करूनही काही लोकांनी पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डागाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न सोडण्याचा निर्णय लोकांनी घेतला आणि मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच जर राहुल गांधी आपल्या पक्षाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत तर ते देश कसे चालवतील? त्यांच्या याच नियोजनाच्या अभावामुळे ते यंदा अमेठीतून निवडुण आले नसल्याचे सांगत राहुल गांधींना टोला लगावला. यावेळी बोलतना त्यांनी महाराष्रतील आगामी विधानसभा निवडणुकीविषयी आपले मत व्यक्त केले. शिवसेना आणि भाजप यांनी छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष न देता आगामी निवडणुक एकत्र लढावी असे त्यांनी म्हटले. तसेच दोन्ही पक्षांची युतीच 240 किंवा 250 जागा जिंकेल असा विश्वासही यावेळी आठवले यांनी व्यक्त केला.