नवी दिल्ली- लॉक डाऊनचा गरीब लोकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. या समूहाला मदत करण्यासाठी जर नोटा छापण्याची गरज वाटली तर सरकारने त्या शक्यतेवर विचार करावा असे ज्येष्ठ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सुचविले आहे.
जर तळागाळातील लोकांचे जीवन पूर्वपदावर आले नाही तर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले. रोजंदारीवर काम करणारे मजूर, छोट्या उद्योगात अनौपचारिकपणे काम करणारे कामगार इत्यादीवर सध्या जास्त परिणाम झाला आहे. त्याना मदत मिळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.