नवी दिल्ली: काँग्रेस आणि भाजप पक्षामध्ये देशातील अनेक मुद्यावरून कलगीतुरा नेहमीच रंगलेला दिसून येतो. आरोप प्रत्यारोपच्या दरम्यान पक्षातील नेते अनेकदा वादग्रस्त विधान करीत असतात. अशातच पुन्हा एकादा भाजपमध्ये दलित नेत्यांना काडीची किंमत नाही. या वादग्रस्त विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले, ‘माझी भाजपमध्ये राहण्याची लायकी नव्हती’ अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावर काँग्रेसचे नेते उदित राज यांनी आरोप केले असून ते म्हणाले, ‘अगदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपच्या मुख नेत्यांकडून अशीच वागणूक दिली जाते.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सध्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान झालेल्या या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.
चर्चेदरम्यान काँग्रेस नेते उदित राज यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप पक्षावर आरोप केले, ते म्हणाले,’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपचे नेते किंमत देत नाहीत. रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उभे राहतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींनी हात जोडून नमस्कार केला तर मोदी त्यांचं अभिवादनही स्वीकारत नाहीत, असे उदित राज यांनी भाजपच्या प्रवक्त्याने देशाचे राष्ट्रपती दलित आहेत, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आक्रमक भूमिका घेत आपले मत मांडले.
दरम्यान, काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादीचं सरकार असलेल्या देशात दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला होता. भाजपा आणि देशातील दलित अत्याचाराच्या मुद्यावरून भाजप आणि विरोधी पक्षात कलगीतुरा पाहायला मिळत आहे.