मुंबई – महाविकास आघाडी सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ निश्चितपणे पूर्ण करणार आहे. कारण आमचे सरकार हे एकजुटीने किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. दुसरीकडे वर्षभरापासून विरोधी पक्ष सरकार पडण्याचा सातत्याने डाव रचत आहे.
परंतु महाविकास आघाडीने ठरवले, तर राज्यातील संपूर्ण भाजप रिकामी होईल. मात्र, तसे करण्याचा आमचा कोणताही हेतु नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
बिहारमध्ये राजकीय ‘भूकंप’ होणार; संजय राऊत यांचे भाकीत
नवाब मलिक म्हणाले, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व इतर काही नेते गेल्या 1 वर्षांपासून सरकार पडणार असल्याची विधाने करत आहेत. कारण त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. पण महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे पूर्ण करणार आहे.
बायडेन यांच्या भावी मंत्रिमंडळात ‘डझनभर’ भारतीय वंशीय; महत्वांच्या पदांसाठी झाली निवड
आमचे सरकार हे एकजुटीने किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. तिन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे, पण कोणीही आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सहभागी झालेले नाही. जर आम्ही ठरवलं तर भाजप रिकामी होईल पण आम्हाला असे करायचे नाही. काही भाजप आमदारांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. यामुळे एखादा ट्रेलर लवकरच रिलीज होईल, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.