मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला. आजच्या सामनाच्या अग्रलेखात महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील, अशी टीका शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनीही टीकास्त्र सोडले आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, बात ‘हरामखोरीची’ निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा, असे शिवसेनेला त्यांनी सुनावले आहे.
बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल!
106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय?
बेईमानी नेमकी कोण करतेय?
हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा!
1/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020
तसेच, मुंबई साखळी बाँम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना राणावतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना?
मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का ?
पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना?
2/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020
भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?,
भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना?
गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या
देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?
3/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020
कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? अशा प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी’ असेही त्यांनी म्हंटले आहे.
कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना?
बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना?
“बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी” 4/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 9, 2020
दरम्यान, ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचे सामानाच्या अग्रलेखात म्हटले आहे. तर याला कंगनाने देखील उत्तर दिले आहे. ‘मी 16 वर्षांची असताना मुंबईला आले होते. त्यावेळी काही मित्रांसोबत मुम्बादेवीच्या दर्शनाला गेले आणि मला मुम्बादेवीने तिच्याजवळ ठेवून घेतले’, असे कंगनाने ट्वीट करत म्हटले आहे.