मुंबई – मागील काही महिन्यांपासून देशात मोठ्या प्रमाणात ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या धाडी पडत आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस आल्या. तर राष्ट्रवादीचे दोन मंत्री अटकेत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना देखील ईडीची नोटी आली होती. याच ईडीच्या कारवाईवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपला आव्हान दिलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला आव्हान देताना वादग्रस्त शब्दांचा वापर केला. देशात भाजपने दडपशाही सुरू केली आहे. सध्या कुणालाही ईडीची नोटीस देण्यात येते. भाजपने देशात मोकळ वातावरण ठेवलं नसल्याचे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान आपल्याला देखील ईडीची नोटी आली होती. मात्र *** दम असले तर मला उचलून दाखवावं, असं आव्हान आंबेडकरांनी भाजपला दिलं. मात्र यावेळी त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
खताच्या वाढत्या किंमतीवरून त्यांनी पुढाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पणन महासंघ असताना खासगी संस्था आल्या कुठून ? असा प्रश्न उपस्थित करताना देशातील ८० टक्के शेतकरी कंपन्या एकाच समाजाच्या असल्याचं ते म्हणाले. तर सीड्स कंपन्या आमदार, खासदारांच्या असल्याचा दावा त्यांनी केला.