लखनऊ – योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर अनेकदा ते व्यावसायिक असल्याचा आरोप करून ते पतंजलीच्या माध्यमातून भरमसाठ पैसे कमवत असल्याचे म्हंटले जाते. यावर रामदेव बाबा यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता, तर उद्योगपती एलाॅन मस्कपेक्षा श्रीमंत झालो असतो. वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मला जे ज्ञान मिळाले ते लोकांना दिले. जर मी या बौद्धिक संपत्तीचे पेटंट घेतले असते तर मी एलाॅन मस्कपेक्षा श्रीमंत झालो असतो, असे बाबा रामदेव म्हणाले. ते साहित्य आजतक मंचावर बोलत होते.
आपल्या जुन्या विधानाचा संदर्भ देत बाबा रामदेव म्हणाले की, मी एकदा म्हटले होते की, टाटा बिर्ला, अदानी, झुकेरबर्ग, एलोन मस्क, बेरेन बफे आणि बिल गेट्स यांच्यापेक्षा स्वामी रामदेव यांचा काळ महत्त्वाचा आहे. ते सर्वजण स्वतःसाठी जगतात, पण संन्यासी सर्वांसाठी जगतो. म्हणूनच त्याचा वेळ, शक्ती आणि ज्ञान सर्वांच्या कल्याणासाठी आहे.
…तर मी एलोन मस्कपेक्षा श्रीमंत होईन –
इलॉन मस्कचा संदर्भ देत योगगुरू म्हणाले की, मस्क त्यांनी म्हंटले की, मी अशी कार बनवेल, तुमच्यासाठी आकाशात जागा राखून ठेवेल, ते तंत्रज्ञानाबद्दल बोलतात, पण आपल्याकडे वेद, पुराणे, धार्मिक ग्रंथ आणि पूर्वजांचे ज्ञान आहे, त्याचा रिसर्च केला.. त्याचे पेटंट घेतले असते तर इलॉन मस्क यांच्यापेक्षा श्रीमंत झालो असतो, पण आम्ही ते ज्ञान जगाच्या कल्याणासाठी दिले.
गंभीर आजार असलेल्या रुग्णांना बरे केले –
बाबा रामदेव यांनी दावा केला की, त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना बरे केले. ते म्हणाले की, एकीकडे वैद्यकीय माफिया, दुसरीकडे राजकीय माफिया, धार्मिक माफिया, बौद्धिक माफिया, सगळीकडे माफियागिरी सुरू आहे. आम्ही सर्वांसाठी लढतो. संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा ते करू शकली नाही, परंतु आम्ही ते करून दाखवले. साखरेचे (शुगर) रुग्ण बरे होऊ शकत नाहीत, हे आम्ही करून दाखवून दिले आहे. 100-200 युनिट्स इन्सुलिन घेणाऱ्यांना आम्ही बरे केले. आम्ही बीपी, थायरॉईड, यकृत, किडनी प्रत्यारोपणापासून वाचवले. आम्ही एक-दोन महिन्यांत कर्करोग बरा करून दाखवला. संपूर्ण जग योग-आयुर्वेद आणि सनातनचे पालन करेल.
साहित्याशी छेडछाड झाली –
बाबा रामदेव म्हणाले की, साहित्यात छेडछाड करण्यात आली आहे. इतिहासाच्या पुनर्लेखनाची नव्हे तर पुनर्व्याख्याची गरज आहे. ज्या प्रकारे भारताचा गौरवशाली भूतकाळ आहे. यामध्ये आम्हाला काही संघर्षांचा सामना करावा लागला आहे. ते म्हणाले की, भारत 1000 वर्षे गुलाम होता, भारत गुलाम नव्हता, तो संघर्ष करत होता, हे आपण 200 वर्षांपासून वाचत आहोत. आम्ही मुघल किंवा इंग्रजांचे आधिपत्य कधीच मान्य केले नाही.