उन्नाव सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पिडीतेच्या बहिणेची व्यथा
लखनऊ : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडितेला पेटवल्यानंतर ती सुमारे एक किलोमिटर मदतीसाठी धावत होती. मी ज्यावेळी तिला काळीठिक्कर झालेली तिची त्वचा पाहिली तेंव्हा माझ्या डोळ्यात पाणी जमा झाले, मी तिला बरी आहेस ना?असं विचारलं तेव्हा ती म्हणाली, मी बरी होते. मी जरी मेले तरी या आरोपींना फाशीवर लटकावल्याखेरीज राहू नकोस हे तिचे अखेरचे शब्द होते… या पिडितेच्या बहिणीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली.
ही घटना घडण्याच्या आधी ती खूप आनंदी असायची. तिला लोकांशी बोलायला आवडायचे. लोकांशी ती प्रेमाने वागायची. आम्ही घरात तिला खुशी म्हणत असू, असेही तिने सांगितले.
तिला पेटवल्यानंतर तीने मृत्यूपूर्व जबाबात पाच आरोपींची नावे सांगितली आहेत. शिवम त्रिवेदी, त्याचे वडील राम किशोर त्रिवेदी, शुभम त्रिवेदी, त्याचे वडील हरी शंकर त्रिवेदी, आणि उमेश वाजपेयी अशी त्यांची नावे आहेत. शिवमला अटक झाली होती. त्याला 30 नोव्हेंबरला जामीन मिळाला. त्यानंतर ही घटना घडली. शुभमला कुटुंबियांनी दवाखान्यात दाखल केल्याने त्याल अद्याप अटक झाली नाही. हरीप्रसाद त्रिवेदीचे घर सरपंचाचे घर म्हणून ओळखले जाते. तो पाठींबा देईल तोच सरपंच होतो. उमेश वाजपेयी हा ग्रामपंचायतीत कर्मचारी आहे.
हैदराबाद येथील चकमकींचा दाखला देत तिने या आरोपींना असेच यमसदनाला धाडले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली. ती म्हणाली, त्यांना चकमकीत गोळ्या घालून तरी मारा किंचा त्यांना फासावर तरी लटकवा. माझ्या बहिणीला मारण्याचा कट ज्या पध्दतीने त्यांनी अंमलात आणला त्यावरून त्यांना जगण्याचा हक्क नाही. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी यापुर्वी जाहीर केल्यापाप्रमाणे योगींच्या दरबारात जाऊन आत्महत्या करेन. हे सांगत असताना तिच्या डोळ्यात एका बाजूला असहाय्यपणा तर दुसऱ्या बाजूला न्याय मिळवण्याचा ठाम निश्चय उमटत होता.
तिला पेटवले त्या दिवशी नेहमीप्रमाणे लवकर उठली नाही. मला 10 मिनिटांनी उठव असे सांगून ति झोपून राहिली. उपाशी पोटी ती पहाटे साडेतीन वाजता चार किमी अंतरावरील भिवसारा स्थानकाकडे वकीलांना भेटायला गेली. सकाळी साडेसातच्या सुमारास खुशीला पेटवले आहे. तिला दवाखान्यता दाखल केल्याचे सांगण्यात आकले. मी काही काळ तिच्या सोबत हॉसपिटलमध्ये थांबले. त्यानंतर कोणी खुशीला पाहिले का ते पाहण्यासाठी बाहेर पडले.
जेव्हा तिला पेटवले तेव्हा वाचवा वाचवा म्हणून ति जिवाच्या आकांताने ओरडत होती. तेंव्हा मदतीला कोणी आले नाही. काही जण तर तिच्याजवळ सुध्दा गेले नाहीत इतकी ती भीषण दिसत होती. ती आपले नाव सांगून मदत करण्याची विनवणी करत होती. तिनेच कोणाचा तरी मोबाईल घेऊन रुग्णवाहिका बोलावली. त्यावेळी लोकांनी विनंती केल्यानंतर तिच्या अंगावर चादर टाकण्यात आली.
कारागृहातून बाहेर येताच सामुहिक बलात्कार करणाऱ्या आरोपीने फोन करून तिला धमकावण्यास सुरवात केली. मला जेलमध्ये पाठवलंस पण तु कोठे आहेस हे मला माहित आहे,असे तो तिला धमकावत असे. आपल्याला न्याय मिळवायचा आहे, हेच तिचे ध्येय होते, असे सांगून खुशीच्या कपड्यांकडे पहात ती म्हणाली, मी नेहमी तिचे कपडे घालायची. आता त्याच्या फक्त आठवणीच उरल्या आहेत.
आरोपीला जामीन मिळण्याच्या आधीपासून तिला आणि कुटुंबियांना धमक्या देण्यात येत होत्या. त्यांच्या एका काकाचे घर पेटवून देण्यात आले. मुख्य आरोपीच्या घरातून आम्ही तीस लाख रुपये चोरले, अशी बनावट फिर्याद दाखल केली. माझ्या वडिलांवर आणि भावावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला, असेही तिने सांगितले.
खुशीचे वडील म्हणाले, ज्या बाईला मी आयुष्यात कधी पाहिले नाही, त्या बाईने माझ्यावर बलात्काराचा आरोप केला. हे आरोपीच या षडयंत्रामागे आहेत.
खुशीची बहिण म्हणाली, खुशी आगीला खूप घाबरायची. मी चूल पेटवून दिल्यानंतर ती स्वयंपाक करायची. तिच आग तिचा जीव घेईल, असे कधी वाटलेही नव्हतं. माझं लग्न ठरलं की माणसे पाठवून माझ्याबद्दल माझ्या कुटुंबियांबद्दल वाईट साईट सांगून ते लग्न मोडल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. पण आता तिच्या न्याययाची लढाई आता मला लढायची आहे, असेही या बहिनीने ठामपणे सांगितले.