मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. अशातच बिहारमध्ये विकासाच्या आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. परंतु, जर मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील, असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Elections in Bihar should be fought on the issues of development, law & order, and good governance, but if these issues have exhausted, then issues from Mumbai can be sent as parcel: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/jD8N0E7Zt8
— ANI (@ANI) September 26, 2020
विधानसभेची मुदत संपत असेल तर निवडणूक झालीच पाहिजे. परंतु, देशात करोना विषाणूसारखी महामारी असताना बिहारमध्ये विधानसभा निवडणुका घेणे योग्य आहे का? साथीच्या रोगामुळे देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, जी यापूर्वी कधीही नव्हती. बिहारमध्ये करोना आता संपला आहे काय? निवडणुका घेण्याकरिता परिस्थिती योग्य आहे का? प्रचारसभा कशा होणार? मतदान तर ऑनलाइन करु शकत नाही, त्यासाठी जाऊन रांगेत उभं राहावं लागेल. सोबत मतदानाची टक्केवारीही कमी नाही झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं गरजेचं असून गरीब लोक आज घराबाहेर पडत नाही, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
बिहार निवडणूक आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या मुद्दय़ाबद्दल विचारले असता सरकारला विकासाबद्दल किंवा सुशासनाबाबत काहीही सांगायचे नाही, असे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणी अनेक सेलिब्रेटींची चौकशी केली जात असल्यासंबंधी विचारण्यात आले असता एनसीबीला चौकशीचा अधिकार असून ते बोलावू शकतात असे सांगितले.