अहमदनगर – महाराष्ट्रात करोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झालेली झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून प्रत्येक शहरात कडक निर्बंध सुद्धा लागू करण्यात आले आहे. वाढत्या संख्येमुळे काही ठिकाणी ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.
दरम्यान, अश्यातच आता करोना रुग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावच्या डॉक्टरांनी एक अजब दावा केला आहे. ‘करोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास रुग्ण लवकर बरा होता’ असा अजब डॉ. अरुण भिसे यांनी केला आहे. सध्या सर्वत्र डॉक्टरांच्या या दाव्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
या उपचारामुळे तब्बल 40 ते 50 करोना बाधित रुग्ण बरे झाले, तर यातील 10 गंभीर रुग्ण होते असल्याचे सुद्धा डॉ.अरुण भिसे यांनी म्हंटलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.