मुंबई – मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच ८ वा स्मृती दिन साजरा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहेत. यंदाच्या स्मृतीदिनाला वेगळी राजकीय पार्श्वभूमी मिळाली आहे. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री पदी विराजमान झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आजपर्यंतची भाजपसोबतची साथ सोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे.
Entire day has passed n not a single message or tweet from the congress leadership on the death anniversary of the late Balasaheb Thackeray!
If Balasaheb is not even acknowledged then what’s left with the Shiv Sena??— nitesh rane (@NiteshNRane) November 17, 2020
यातच महाविकासआघाडीतील काँग्रेस पक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर नसल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे ट्विटमध्ये म्हणतात,’काल बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. मात्र, संपूर्ण दिवसभरात काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी संदेश किंवा साधे ट्विटही करण्यात आले नाही. काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर मग शिवसेनेकडे उरले तरी काय ? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.’