नवी दिल्ली- वाढीव वीज बिलांतून उत्तरप्रदेशातील वीज ग्राहकांना लुटले जात असून राज्यात कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर वीज बिलाच्या लुटीतून ग्राहकांना दिलासा मिळेल असे आश्वासन कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दिले आहे.
उत्तरप्रदेशात वीज विभागाने मजुरांना वीज बिल थकबाकीच्या नोटीसा जारी केल्या आहेत. त्याच्या बातमीचे कात्रण सोशल मिडीयात प्रसारीत करून प्रियंकांनी ही टीका केली आहे.
ज्या कुटुंबांना आपली रोजी रोटी मिळवणे अवघड झाले आहे, किंबहुना ज्यांचे जगणेच मुष्किल झाले आहे त्यांना वीज बिल थकबाकीच्या नोटीसा जारी केल्या गेल्या आहेत.
वाढीव वीज बिलांतून राज्यातील जनतेची लूट सुरू असून कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर ही लूट थांबेल असे आश्वासन त्यांनी दिले.