पंढरपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकीत चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ, असे आव्हान दिल होत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
दरम्यान, जयंत पाटील आज पक्षाच्या बैठकीसाठी पंढरपूरमध्ये आहेत. दरम्यान त्यांनी भाजपलाही स्वतंत्र लढण्याचे आव्हान दिले. आणि भाजप स्वतंत्र लढले तर त्यांना केवळ 60 ते 65 जागाच मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा ते जिंकू शकणार नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले.