मुंबई – भाजपकडे सत्ता नसेल तर त्यांचे नेते वेडे होतील. त्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. यानंतर भाजपच्या नेत्यांसाठी वेड्यांची रुग्णालये बांधायला सांगू, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकेची तोफ डागली.
संजय राऊत म्हणाले कि, कितीही प्रयत्न करा पण आम्ही भाजपला पुरुन उरू. ऑपरेशन कमळमध्ये सीबीआय, ईडी, आयकर विभागासारख्या यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. मात्र, भाजपचे आमदारही आमच्याकडे येऊ शकतात, तसेही भाजपमध्ये असलेले अनेक आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीचेच आहेत. ते पुढे म्हणाले, विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी आमचा बहुमताचा आकडा तुमच्यापेक्षा १० ने जास्त असेल, बहुमत आमच्याकडेच असेल आणि आम्हीच सरकार स्थापन करू, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेला जे वचन दिले होते तेच आता अजित पवारांना दिल्याचे समजते आहे. अजित पवारांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि २० मंत्रिपदाची ऑफर भाजपने दिली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी बदनाम केलं, बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Sanjay Raut, Shiv Sena: There are four people in ‘Operation Kamal’; CBI, ED, Income Tax dept and Police carry out ‘Operation Kamal’. But it will not yield any result here. If you have the majority then why do you need an ‘Operation Kamal’? #Maharashtra https://t.co/KLZbqNncdx
— ANI (@ANI) November 25, 2019